Search
Close this search box.
arihant-logo

अरिहंत कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात मराठी विभागातर्फे ‘मराठी भाषा पंधरवडा’ साजरा करण्यात आला. मराठी भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने दि. १४ जानेवारी ते २८ जानेवारी दरम्यान ‘मराठी भाषा पंधरवडा’ साजरा करण्यात येतो. अरिहंत महाविद्यालयात दि. २० जानेवारी २०२५ ते २३ जानेवारी २०२५ या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे नियोजन डॉ. तेजाली गवळी यांनी केले. या उपक्रमात हस्तलिखित प्रकाशन, मुलाखत कार्यक्रम, हस्ताक्षर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, पथनाट्य कार्यशाळा असे विविध उपक्रम राबविण्यात आले.

                दि. २० जानेवारी रोजी या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळेस शिवांजय बुटेरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ‘ अभिजात मराठी ‘ या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी परिश्रमपूर्वक असे हस्तलिखित बनविले. त्याचबरोबर, शिवांजय बुटेरे यांची मुलाखत कु. स्मरणिका म्हात्रे या विद्यार्थिनीने घेतली. या मुलाखत कार्यक्रमाच्या निमित्ताने आजच्या तरुण पिढीने मराठी भाषेचे संवर्धन कसे करावे व आपण देशाचे भवितव्य आहोत यामुळे आपण कसे घडलो पाहिजे हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. मोहित म्हापळकर व कु. स्मरणिका म्हात्रे यांनी केले. या कार्यक्रमासाठी एकूण ६७ विद्यार्थी उपस्थित होते. या दिवसाची सांगता डॉ. तेजाली गवळी यांनी केली. 

            दि. २१ जानेवारी रोजी ‘ हस्ताक्षर स्पर्धा ‘ घेण्यात आली. या स्पर्धेत एकूण १८ विद्यार्थ्यानी सहभाग घेतला.  व दि. २२ जानेवारी रोजी ‘ वक्तृत्व स्पर्धा’ घेण्यात आली.’ अभंग निरूपण ‘ या विषयावर विद्यार्थ्यांनी वक्तृत्व सादर केले. याचे परीक्षण प्रा.शिवानी वर्मा व प्रा. पल्लवी सावळेकर यांनी केले. या स्पर्धेत एकूण ६ विद्यार्थ्यानी सहभाग घेतला.

दि. २३ जानेवारी रोजी ‘ पथनाट्य कार्यशाळा ‘ घेण्यात आली. यावेळेस पथनाट्यसंबंधी माहिती डॉ. तेजाली गवळी यांनी दिली व एका पथनाट्याचे सादरीकरण दृक-श्राव्य माध्यमातून दाखविण्यात आले. तसेच, हस्तलिखित निर्मितीमध्ये सहभागी विद्यार्थी व स्पर्धेतील निवड झालेले विद्यार्थी यांचे गुणगौरव करण्यात आले. समारोप कार्यक्रमात प्राचार्य डॉ. मंगेश ताकपिरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रा. शिवानी वर्मा यांनी समारोप व बक्षीस समारंभ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळेस एकूण ६७ विद्यार्थी उपस्थित होते. 

            मराठी भाषा पंधरवडा निमित्त विविध कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. अशाप्रकारे, ‘मराठी भाषा पंधरवडा’ अंतर्गत विविध कार्यक्रमात विद्यार्थी व शिक्षक यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. समारोप कार्यक्रमामध्ये डॉ. तेजाली गवळी यांनी आभार व्यक्त केले. अशाप्रकारे, दि. २३ जानेवारी २०२५ रोजी मराठी ‘भाषा पंधरवडा’ या कार्यक्रमाची सांगता झाली.